निवास व्यवस्था (मंडप)
निवास व्यवस्था :
वारकऱ्यांच्या संख्येनुसार विसावा, विहार परिसरामध्ये श्री संस्थेद्वारे सेवाभावपूर्वक आवश्यक त्या सर्व प्राथमिक सुविधांची व्यवस्था करण्यात येते. श्री कृपेने येथे येणाऱ्या वारकऱ्यांकरिता महाप्रसाद, प्रथमोपचार, पिण्याचे शुद्ध पाणी, स्नानगृह व सेवा अखंडपणे उपलब्ध करून दिल्या जातात.
‘श्री’च्या पुण्यतिथी उत्सवामध्ये (पावसाळा असल्याने) साहित्य वितरण व अंशदान प्रक्रियेसाठी मजबूत असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येतो. प्रत्येक उत्सवामध्ये उपस्थित वारकऱ्यांची संख्या मागील वर्षीपेक्षा २५ ते ३० टक्के वाढीव असल्याने, वारकऱ्यांना त्या वाढी प्रमाणात निवास तसेच इतर सुविधांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. वारकरी संस्थेच्या आकडेवारीनुसार मंडप देण्यात येतात. मंडपामध्ये येण्या-जाण्याकरिता प्रशस्त मार्ग आखण्यात येतो. प्रत्येक मंडपामध्ये साफसफाईकरिता एक सेवाधारी तसेच त्यांचे देखरेखकरिता एक देखरेख सेवक असतो. वारकऱ्यांना येणाजाण्याच्या माहिती देणारी याकरिता मंडपाच्या बाहेरील बाजूस सर्व रस्त्यावर मंडप क्रमांक व गेट क्रमांकाचे बोर्ड लावण्यात येतात. वारकऱ्यांना सूचना व माहिती देण्याकरिता स्पीकरची व्यवस्था करण्यात येते. ट्यूबलाइट (बल्ब आदींसह) यांची बाहेरील रस्ते व अन्य ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात येते. सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून श्री संस्थेच्या अग्निशमन वाहनांची व्यवस्था तसेच अॅम्ब्युलन्स २४ तास उपलब्ध असते.
काही दिंड्या स्वतःच्या व्यवस्थेत येतात त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शिधा वितरण केले जाते. स्वयंंपाक करण्याकरिता विटा व लाकडे पुरविण्यात येतात. दिंड्यासोबत पाणी टँकर व स्वतःचा मंडप असल्यास त्यांना श्री संस्थेकडून सहयोग निधी देण्यात येतो तसेच परिसरामध्ये लाईट व्यवस्था, आखणी आणि वाहन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते.